२३ नोव्हेंबरपासून शाळा सुरु
नववी ते बारावी चे वर्ग टप्प्याटप्प्याने सुरु करणार
पुणे : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रात जणू काही ब्रेक लागला होता.ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरु असले तरी विद्यार्थी शाळेची आतूरतेने वाट पाहत होते. दीर्घकाळाच्या प्रतीक्षेनंतर दिवाळीनंतर शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी पालक व मुलांना कोरोनाविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे.
पहिल्या टप्प्यात नववी ते बारावी चे वर्ग सुरु करण्यात येणार आहेत. त्यानंतर एकूण परिस्थिती पाहून इतर वर्ग सुरु करायचे ते ठरवणार आहे. अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. शाळांचे सॅनिटायझेशन, शिक्षकांची कोरोना तपासणी याची काळजी घ्यायची आहे, त्याचबरोबर एखाद्या विद्यार्थ्यांच्या घरात कोणी आजारी असेल तर पालकांनी आपल्या पाल्याला शाळेत पाठवू नये. त्याबाबत शिक्षकांना सूचना द्यावी असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे .
शाळा सुरु होणार पण, नियम पाळणे बंधनकारक
-शाळा सुरु होण्यापूर्वी संबंधित शिक्षकांची 'आरटीपीसीआर' चाचणी करणे बंधनकारक
-एका बेंचवर बसणार एकाच विद्यार्थी
- मास्क बंधनकारक
-शाळा भरण्यापूर्वी व सुटल्यानंतर शाळेचे सॅनिटायझेशन करणे आवश्यक
-नववी ते बारावीचे वर्ग एक दिवसाआड भरतील
-इंग्रजी, गणित विज्ञान यांसारख्या कठीण विषयांचे वर्ग प्राथमिक स्तरावर घेतले जातील. इतर विषय ऑनलाईन क्लास मध्ये घेतले जातील.
-प्रत्येक विद्यार्थ्याने आपली पाण्याची बाटली सोबत आणावी.
- पालक, शिक्षक व स्थानिक प्रशासनाने एकमेकांना सहकार्य करावे.




Comments (0)
Facebook Comments (0)